Advertisement

२५ मेपासून संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार 'सोबत'!


२५ मेपासून संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार 'सोबत'!
SHARES

प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्य वेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटातून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार आहे. अल्पवयीन प्रेमाचा शोध हा चित्रपट घेणार आहे. 'सोबत' हा चित्रपट २५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



काय आहे कथा

'सोबत' ही गोष्ट आहे करण आणि गौरी या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रेमिकांची...गौरीच्या घरून असलेल्या विरोधाला तोंड देत करण गौरीशी लग्न करतो. त्यानंतर मात्र तो मोठ्या अडचणीत सापडतो. गौरीशी लग्न केल्यावर करणला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? गौरी आणि करणचं लग्न टिकतं का? असे अनेक प्रश्न हे कथानक उभे करतं. आपल्या आजुबाजूला घडणारा ताजा विषय मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाठशाला, हमने जिना सिख लिया, डेहराडून डायरी, हनुमान असे बरेच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केलेल्या मिलिंद उके यांनी 'सोबत' दिग्दर्शित केला आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगळा विषय हाताळला आहे. त्यामुळे 'सोबत' या चित्रपटाचाही त्याला अपवाद ठरणार नाही.


हे दिग्गज कलाकार आहेत सोबत

हिमांशू विसाळे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे. तसंच रुचिरा जाधव, गिरीश परदेशी, स्मिता गोंदकर, नागेश भोसले, प्रदीप वेलणकर, विजय गोखले, मनोज टाकणे, अभिलाषा पाटील, अश्विन पाटील, कौस्तुभ जोशी या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.



हेही वाचा

ह्ये 'इपितर' लैच येडे भो!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा