Advertisement

फडणवीसांच्या काळात 'महाआयटी'मध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा : संजय राऊत

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

फडणवीसांच्या काळात 'महाआयटी'मध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा : संजय राऊत
SHARES

देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केला आहे.

ते म्हणाले की, मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे आणि पीएमसी घाटोळ्यात याच मोहित कंबोजचा हात आहे.

संजय राऊत म्हणासे, पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे. राकेश वाधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. निकॉन इन्फ्रा कोणाची आहे हे मला विचारायचे आहे. ही नील सोमय्याची आहे आणि तो वाधवानचा पार्टनर आहे मौजेमध्ये एक प्रकल्प त्यांनी उभारला आहे.

पुढे ते म्हणाले, वाधवानला ब्लॅकमेल केलं आणि जमीनीसोबत ८०-१०० कोटी घेतले आहेत. राकेश वाधवानच्या खात्यातून २० कोटी गेले आहेत. त्यांनी म्हणे पीएमसी बॅंक घोटाळा काढला म्हणे, पत्रा चाळ घोटाळा काढला. मला त्रास देण्यासाठी माझ्या मित्रांना त्रास देतायत पीएमसी घोटाळ्यातील पैसे वापरतायत, राकेश वाधवान आरोपी आहे आणि आम्ही पैसे वारतोय असं म्हणत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. पीएमसी बॅंकेचा तपास ईडी करतं आहे. त्यामुळे ईडीकडे मी हे कागदपत्र पाठवले. मात्र हा सोमय्या तिथे दही, खिचडी खातो. हे सर्व ईडीचे एजंट झाले आहेत, असे देखील संजय राऊत या वेळी म्हणाले.



हेही वाचा

ते साडे तीन नेते कोण? हे उद्यापासून कळेल - संजय राऊत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा