बोरीवली - मुंबईमध्ये आचारसंहिता सुरू होऊनही मुंबईमध्ये राजकीय नेतेच आचार संहितेला हरताळ फासत असल्याचे दिसत आहे. बोरीवली विधानसभा क्षेत्रामध्ये तर सत्ताधाऱ्यांनीच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार गोपाळ शेट्टी आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे बॅनर आचारसंहितेच्या काळातही झळकताना दिसत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आचारसंहिता असूनही सत्तेचा कसा गैरवापर करतायेत हे समोर आले आहे.