Advertisement

शिवसेनेशी बोलणं झालं असेल, पण आमच्याशी नाही, चव्हाणांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला

शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) आपल्याला २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी आॅफर दिली होती. हा काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळून लावला.

शिवसेनेशी बोलणं झालं असेल, पण आमच्याशी नाही, चव्हाणांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला
SHARES

शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) आपल्याला २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी आॅफर दिली होती. परंतु ही आॅफर मी धुडकावून लावल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी केला होता. हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी फेटाळून लावला आहे. 

हेही वाचा- २०१४ मध्येच शिवसेनेकडून सत्तास्थापनेची आॅफर, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

काय म्हणाले होते चव्हाण? 

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) म्हणाले,  २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (congress) एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु दोन्ही पक्षांचा हा प्रस्ताव मी फेटाळून लावला. विरोधी विचारधारा असलेल्या पक्षासोबत आघाडी करण्याऐवजी विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. आताही शिवसेनेसोबत (shiv sena) सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) उत्सुक नव्हत्या. परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत आघाडीचा निर्णय घेतला.

चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. चव्हाण यांचं वक्तव्य नक्कीच गांभीर्याने घेतलं पाहिजे. यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होताे. सत्तेपुढं विचारधारा, तत्व, मूल्य अशा गोष्टींना काहीच किंमत नाही का? हे शिवसेनेने आधी स्पष्ट केलं पाहिजे, फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

तर, महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi)मधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला. काँग्रेस हा एक वेगळा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचं काँग्रेससोबत बोलणं झालं असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेचं असं कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. तसंच कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आला नव्हता, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा