दहिसर - राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहिसर धारखाडी अवध विद्यालयात विहार प्रांत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेता अॅड. इंद्रपाल सिंह,अमरनाथ झा,अजय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रपाल सिंह यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. पालिकेमध्ये हफ्ताखोरी असते त्यामुळे पालिकेने तयार केलेले रस्ते 6 महिन्यात खराब होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.