राज्यातील (maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता वेगात आली आहे. त्यानुसार, राज्य सरकारने महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी प्रभाग रचनेचे (ward preparations) आदेश जारी केले आहेत.
ही प्रक्रिया अ, ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी राबविण्यात आली आहे. या यादीत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली अशा 9 महानगरपालिकांचा समावेश आहे.
गेल्या 3 ते 4 वर्षांपासून पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांसाठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) आदेशानंतर, राज्य सरकारने संबंधित प्रशासनाला प्रभाग रचनेबाबत आवश्यक सूचनाही दिल्या आहेत. लोकसंख्येचे निकष लक्षात घेऊन प्रभागांची रचना करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पूर्वीप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc elections) क्षेत्रातील 227 एकल सदस्यीय प्रभागांवर निवडणुका घेण्यात येतील. महाविकास आघाडीच्या काळात 236 प्रभाग निर्माण करण्यात आले होते. परंतु सत्ता बदलल्यानंतर ते पुन्हा 227 वर आणण्यात आले.
न्यायालयात आव्हान दिल्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की महापालिका निवडणुका जुन्या रचनेनुसारच होतील.
वेगवेगळ्या वर्गवारीनुसार महानगरपालिकेची रचना
वर्ग अ - पुणे, नागपूर - चार सदस्यीय प्रभाग
वर्ग ब - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड - चार सदस्यीय प्रभाग
वर्ग क - नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली - चार सदस्यीय प्रभाग
वर्ग ड - अमरावती, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, मालेगाव, लातूर इत्यादी - प्रभागांची संख्या 3, 4 किंवा 5 सदस्यीय असेल
या महत्त्वाच्या निर्णयामुळे, लवकरच महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय घडामोडींना चालना मिळणे साहजिक आहे.
हेही वाचा