Advertisement

Farm Laws : सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली - मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Farm Laws : सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली - मुख्यमंत्री
SHARES

कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्यानं आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे.

केंद्रानं यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसंच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीनं हिताचा निर्णय घ्यायला हवा म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे."



हेही वाचा

सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याची पंतप्रधान मोदी यांची घोषणा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा