आधीच तोट्यात असलेल्या बेस्टने कोट्यवधी रुपये खर्चून 6 इलेक्ट्रिक बसची खरेदी केली आहे. शुक्रवारी वडाळा आगारात या बसचे लोकापर्ण होणार आहे.
खरेतर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने ही नवीन शक्कल लढवली आहे. विशेष म्हणजे हे बस कोणत्याही प्रकारचे इंधन किंवा वायूवर चालणारे नाही. त्यामुळे प्रदूषणाला आळा तर बसेल. पण या एका बसची किंमत ही इतर बेस्ट बसच्या तुलनेत तीन पटींनी जास्त आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने केलेल्या या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वडाळा आगारत शुक्रवारी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस दक्षिण मुंबईतील रस्त्यावर धावणार आहे. सध्या सहा पैकी चार बसेस या कुलाबा येथील आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. या बसेस चार्जिंगवर चालणार आहेत. चार्जिंग पूर्ण झाल्यावर ही बस २०० किमी धावू शकेल. हे एकमेव चार्जिंग पॉंईंट फक्त कुलाबा आगारात आहे. पण जर मुंबईतल्या वाहतूककोंडीत जर बस मध्येच बंद पडली तर काय होणार? हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.