कोरोना साथीच्या आजारामुळे मुंबई आणि दिल्लीमध्ये काम करणारे बरेच मजूर आपापल्या गावी गेले होते. पण गावी गेलेले मजूर पुन्हा मुंबईत येत आहेत. या मजूरांसाठी लवकरच मुंबईकडे जाण्यासाठी अनेक अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गोमतीनगर स्टेशनला जागतिक दर्जाचे स्टेशन बनवण्याचं कामही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
रेल्वे अनेक नवीन गाड्या नव्या वेळापत्रकासह चालवणार असून प्रवाशांना सोईस्कर होईल. हे ईशान्य रेल्वे डीआरएम डॉ. मोनिका अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लॉकडाऊन दरम्यान ट्रॅकची दुरुस्ती रेल्वेनं पूर्ण केली असल्याचं डीआरएमनं सांगितलं.
रेल्वेनं ६०० कि.मी. अंतरावर मिनी रॅक चालवली आहेत. मल्टी पॉईंट रॅक आणि दोन पॉईंट लोडिंग सुविधा चालवण्यात येत आहेत जे 500 किमी पर्यंत चालवल्या जात आहेत.हेही वाचा