Advertisement

१ जूनपासून राज्यात रिक्षा वाहतूक सुरू करावी - शशांक राव


१ जूनपासून राज्यात रिक्षा वाहतूक सुरू करावी - शशांक राव
SHARES

मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. केवळ बेस्ट बस व एसटी रस्त्यावर धावत असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत आहे. वाहतूक सुविधा बंद असल्यानं रिक्षा व टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट आलं आहे.

मागील २ महिन्यांपासून अधिक काळ रिक्षाचालकांचं उत्पन्न पूर्णपणे बंद आहे. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळं सरकारनं १ जूनपासून राज्यात रिक्षा वाहतूक सुरू करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियननं केली आहे.

राज्य सरकारनं नुकतंच रिक्षा परवाने खुले केल्यामुळं मोठ्या संख्येनं बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून रिक्षा विकत घेतल्या. लॉकडाउन काळात केंद्र सरकारनं कर्जहप्ते विलंबानं भरण्यास मुभा दिली आहे. तरीही ते भरावेच लागणार आहेत. आगामी मंदीच्या काळात रिक्षाचालकांचा व्यवसाय हा बुडीत स्वरूपाचा ठरण्याची शक्यता आहे. 

अनेक रिक्षा चालकांना कर्जाची चिंता असताना घरखर्चही आहे. त्यातच २ महिन्यांपासून गाडी उभी असल्यानं ती बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सरकारनं रिक्षाचालक व मालकांच्या कुटुंबीयांसाठी तातडीनं १०,००० रुपये द्यावे, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे.



हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा