Advertisement

आपल्या अफेअर्सबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलली कंगना


आपल्या अफेअर्सबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलली कंगना
SHARES

नैसर्गिक अभिनय आणि वेगळी बोली या कलागुणांनी अवगत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही पहिल्यांदाच आपल्या अफेअर्सबद्दल उघडपणे बोलली आहे. आपल्या आधीच्या सगळ्या बॉयफ्रेंडला कंगनाने नकार दिला नाही तर, तिच्या बॉयफ्रेंडने तिला सायको ठरवून डीच केलं आहे. होय असं खुद्द कंगनाच म्हणते. एका टीव्ही न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने याबाबत खुलासा केला आहे.


काय म्हणाली कंगना?

कंगना म्हणाली प्रेम करणं याचा अर्थ केवळ फिजिकल अॅट्रॅक्शन किंवा सेक्स करणं नाही. प्रेम करणं ही एक वेगळी भावना आहे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती तिथे नसतानाही तिच्याबद्दल विचार करणं म्हणजे प्रेम होयं. पण हेच मी माझ्या बॉयफ्रेंडला सांगायचे तेव्हा ते मला सायको म्हणयचे, आणि मला डंप करून निघून जायचे.

माझ्या आयुष्यात कोणी आलं की मला वाटायचं हे माझं शेवटचं प्रेम आहे. मात्र त्याच्या जाण्यनंतर मला खूप दुख: व्हायचं. त्यानंतर वाटयचं मी कधीच प्रेमात पडणार नाही. पण दोन महिने गेल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्याच्या प्रेमात पडायचे.


'कंगनाचं नाव यांच्याबरोबर जोडलं गेलं'

याआधी कंगनाचं नाव आदित्य पांचोली, शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन आणि ऋतिक रोशन यांच्याबरोबर जोडली गेली होती. आदित्यच्या विरोधात कंगनाने केसही दाखल केली होती. तर अध्ययन सुमनच्या कुटुंबाने काळी जादू केल्याचा आरोप कंगनावर लावला होता. तर ऋतिकने आपल्याला धोका दिल्याचा आरोप कंगनाने केला होता.

कंगना सध्या मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मणिकर्णिका झासीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा