
मात्र, नव्या यंत्रणेकडे संक्रमण सुरू असल्याने या भागांमध्ये काही ठिकाणी कचरा उचलण्यात तात्पुरता विलंब होत आहे. ही व्यवस्था पुढील तीन ते चार दिवसांत सुरळीत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबईत दररोज सुमारे 7,200 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. आतापर्यंत कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत होत्या. आता प्रत्येक वॉर्डसाठी एकाच कंत्राटदाराकडे संपूर्ण कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
या नव्या व्यवस्थेमध्ये पुढील सेवांचा समावेश असेल:
घराघरातून कचरा संकलन
कचऱ्याची वाहतूक
सार्वजनिक कचरापेट्यांची देखभाल
रस्त्यांवरील लिटर बिन्सची उभारणी व देखभाल
वेगळा केलेला (Segregated) सुका कचरा संकलन
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र टोल-फ्री कॉल सेंटर
ही एकात्मिक व्यवस्था आठ कंत्राटदारांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. जुन्या यंत्रणेऐवजी पूर्णपणे नवीन व्यवस्था सुरू करत असल्याने, विशेषतः वरळी आणि प्रभादेवी परिसरात काही दिवस तात्पुरत्या अडचणी येऊ शकतात. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बीएमसीने केले आहे.
बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या व्यवस्थेत मोठ्या क्षमतेची बंदिस्त (Enclosed) वाहने वापरली जाणार आहेत. त्यामुळे:
कचरा वाहतुकीसाठी लागणाऱ्या फेऱ्यांची संख्या कमी होईल.
इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन घटेल.
वाहनांमध्ये लीचेट (कचऱ्यातून निघणारे सांडपाणी) संकलन प्रणाली असल्याने सांडपाणी रस्त्यावर गळणार नाही.
दुर्गंधी आणि रस्त्यावर कचरा सांडण्याचे प्रकार कमी होतील.
एकूण वाहनांपैकी 10 ते 15 टक्के वाहने इलेक्ट्रिक असतील, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि इंधनाचा वापर आणखी कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा
