Advertisement

कंगनाच्या अडचणीत वाढ, जावेद अख्तर यांनी घेतली कोर्टात धाव

प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

कंगनाच्या अडचणीत वाढ, जावेद अख्तर यांनी घेतली कोर्टात धाव
SHARES

आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. तर मुंबई पोलिसांनी देखील कंगनाला दुसरी नोटीस बजावली आहे.

एका रिपोर्टनुसार, कंगनाच्या एका वक्तव्यावरून अख्तर यांनी हा दावा ठोकला आहे. कंगनानं दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून तिला धमकावत हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितलं होतं.

स्पॉटबॉय या संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांच्याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे. त्यात नमूद केलं होतं की, कोणत्याही प्रकारची धमकी त्यांच्याकडून दिली गेली नव्हती. जावेद साहब स्वभावानं फार संवेदनशील आहेत. पण हे सगळे फार दिवसांपासून सुरू होतं. आता जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे.

यात पुढे लिहिले आहे की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि जावेद साहब मोठ्या लढाईसाठी तयार आहेत. न्यायालयाबाहेर सेटलमेंट करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे आता कंगनाच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.

कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेलनं ८ महिन्यांआधी ट्विट करून जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिनं लिहिलं होतं की, जावेद अख्तरजी यांनी घरी बोलवलं आणि धमकी दिली की, हृतिक रोशनची माफी माग.

तिच्यावर महेश भट्ट यांनीही चप्पल फेकली होती. कारण तिनं त्यांच्या सुसाइड बॉम्बर चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. दरम्यान, रंगोलीचं हे ट्विट तेव्हा समोर आलं होतं जेव्हा जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.



हेही वाचा

२४ तासांच्या आत महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याचे आदेश

अभिनेत्री अमृता राव झाली आई, दिला गोंडस मुलाला जन्म

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा