प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'सरकार', 'भूत', 'रन' आणि 'रक्त चरित्र' या चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळविली आहे. तथापि, त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, ते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे देखील ओळखले जातात. बऱ्याच मुद्द्यांवर ते वादग्रस्त वक्तव्य करत असतात.
पण यावेळी ते कुठल्या वादग्रस्त पोस्टमुळे नाही एका वेगळ्या कारणामुळे प्रकाशजोतात आले आहेत. यावेळी त्यांनी स्वत:वर बायोपिक बनवणार असल्याचं घोषित केलं आहे.
राम गोपाल वर्मा यांनी बायोपिकची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, तीन भागात ते बायोपिक सादर करणार आहेत. त्यांनी या चित्रपटाचं नाव 'रामू' ठेवलं आहे. ही बायोपिक वादग्रस्त सिद्ध होईल यात काही शंका नाही.
BOMMAKU CREATIONS production house is all set to produce a 3 part biopic film on my life ..it will be very very controversial
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 25, 2020
బొమ్మాకు క్రియేషన్స్ సంస్థ , నా నిజ జీవితాన్ని 3 భాగాలు, అంటే 3 చిత్రాలుగా నిర్మించబోతోంది. pic.twitter.com/UYDEEjLmTe
आपल्या चित्रपटाची घोषणा करत त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, 'बोमाकू क्रिएशन प्रॉडक्शन हाऊस माझ्या आयुष्यावर तीन भागाच्या बायोपिक चित्रपटाची निर्मिती करण्यास तयार आहे. हे खूप वादग्रस्त ठरणार आहे.'
दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की, 'हा चित्रपट बोमाकू मुरली निर्मित करीत आहे. मी त्याची कथा लिहीत आहे आणि दोसाई तेजा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या दिशेनं पाऊल टाकणार आहेत.
राम गोपाल वर्मा यांनीही हा खुलासा केला की प्रत्येक भाग दोन तासांचा असेल. यात त्याच्या आयुष्याचे वेगवेगळे कालखंड आणि बरेच महत्त्वाचे भाग प्रेक्षकांसमोर सादर केले जातील.
चित्रपटाचा पहिला भाग राम गोपाल वर्मा २० वर्षांचे होते तेव्हाच्या जीवनाचा काळ दर्शवेल. यावेळी, त्याच्या महाविद्यालयीन काळात, त्यांचे पहिले प्रेम आणि लोकांसोबती त्यांची लढाई दिसून येईल.
तर दुसर्या भागाचे नाव 'राम गोपाल वर्मा' असं आहे. यात मुंबईतील मुली, गुंड आणि अमिताभ बच्चन यांच्या कथा दाखवण्यात येणार आहेत. हे दोन्ही भाग त्यांच्या कलाकारासाठी दुसर्या कलाकारानं कास्ट केले आहेत.
राम गोपाल स्वत: तिसर्या भागात काम करताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या तिसर्या भागाचं नाव आहे 'आरजीबी - द इंटेलिजेंट इडियट'. यात राम गोपाल वर्मा स्वत:च्याच भूमिकेत दिसणार आहेत. हा भाग त्यांच्या आयुष्यातील अपयश, कार्य, समाज आणि विवाद दर्शवेल.
विशेष म्हणजे, एकीकडे राम गोपाळ यांनी बायोपिकची घोषणा केली. त्याच वेळी तेलंगणा कोर्टानं त्यांच्या निर्देशनात बनवलेल्या नुकत्याच झालेल्या मर्डर चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यांचा चित्रपट ऑनर किलिंगवर आधारित होता.
वास्तविक, तो चित्रपट २०१८ मध्ये बालस्वामीच्या मुलाच्या हत्येवर आधारित आहे. तथापि, कोर्टाचं म्हणणं आहे की, या चित्रपटाचं काम या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावी लागेल.
हेही वाचा