जोधपूर न्यायलायातल्या अवैध शस्त्रसाठा प्रकरणातून बुधवारी सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. त्यामुळे लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सलमान अभिनेता आहे म्हणून की त्याने केलेले समाजकार्य पाहता त्याची मुक्तता झाली आहे? असे अनेक प्रश्न मुंबईकरांनी उपस्थित केले आहेत.