A 14 day home isolation for all domestic passengers arriving in Mumbai is a compulsory precaution against #coronavirus . Government officials desiring an exemption must write to amc.projects@mcgm.gov.in two working days prior to arrival, with work details #AtMumbaisService pic.twitter.com/SMCE2Ev1IM
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 7, 2020
मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला असला तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. आता गावाहून मुंबईत परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत दाखल झालेले शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाईनपासून सुटका मिळवत आहेत. ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने नवीन नियम जाहीर केले आहेत.
हेही वाचा