Advertisement

मुंबईत पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्याव लागत आहे.

मुंबईत पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात
SHARES

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्याव लागत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळं या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.

रविवार २७ फेब्रुवारी रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळं मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

भातसा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळं मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.  सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा