देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. मुंबईत 20 मे 2024 रोजी निवडणुका होणार आहेत. 4 जूनला मतमोजणी होईल. लोकसभा निवडणूक 2024 शी संबंधित प्रत्येक माहिती अचूक बातम्यांसह तसेच महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक लोकसभा जागेच्या ठळक बातम्या, तपशीलवार माहिती आणि योग्य बातम्यांसाठी या पेजसोबत रहा.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
गेल्या वेळेस राज्यात चार टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर अशा एकूण 89 जागांवर मतदान होईल.
तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दमनदीव मधील एकूण 94 जागांवर मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 96 जागांवर मतदान होणार आहे.
पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील 49 जागांवर मतदान होणार आहे.
सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली मधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे.
सातव्या टप्प्यात 1 जून रोजी बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे.