भांडुप (bhandup) जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी (water pipeline) बदलण्याचे काम प्रस्तावित असल्या कारणाने मुंबईतील (mumbai) काही भागात पाणी कपात करण्यात येणार होती.
3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 14 प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात (water supply) 15 टक्के कपात लागू करण्याचे नियोजन होते.
मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईत (mumbai) येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यास असलेली तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे.
जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्याकामी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे.
या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे 15 टक्के घट होणार आहे.
याचा परिणाम म्हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण 14 प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली जाणार होती.
याअंतर्गत 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात लागू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी मुंबई महानगरात येत असतात.
या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे.
हेही वाचा
