मुंबईकरांना आता २४ तास महापालिकेच्या उद्यानांमध्ये फिरता येणार आहे. कारण, महापालिकेनं मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील २३ उद्यानं २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शनिवारी हा निर्णय जाहीर केला असून, सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबई महापालिकेची शहर आणि उपनगरांत मिळून सुमारे ७५० उद्यानं आहेत. या उद्यानांचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो तसेच, आरोग्याच्या दृष्टीनंही ही उद्यानं महत्त्वाची आहेत. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करत विविध भागांतील २३ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्यानं २४ तास खुली राहाणार असल्यानं त्यामधील सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले असून, या उद्यानांचं रक्षण आणि देखभाल ही उद्यानं खुली असतानाच करावीत, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. उद्यानं २४ तास खुली ठेवण्यासाठी उद्यांनाच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचं फलक तातडीनं लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, मुंबईत दिवसाढवळ्या सुरू असलेली गुन्हेगारी व इतर प्रकार पाहता उद्यानं २४ तास खुली ठेवणं योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई
पूर्व उपनगर
पश्चिम उपनगर
हेही वाचा -
डोंबिवलीत पडला तेलमिश्रित पाऊस, रहिवाशी हैराण
मुंबई- पुणे महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर, योग्य वेळेत होणार उपचार