
एअर इंडिया एक्सप्रेस संपूर्ण भारतातील देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या व्यापक विस्ताराचा भाग म्हणून 1 मे पासून मुंबई (mumbai)-अहमदाबाद (ahmedabad) थेट विमानसेवा (direct flight) सुरू करणार आहे.
ही एअरलाइन सुमारे 10 नवीन देशांतर्गत मार्ग देखील सुरू करत आहे. ज्यामुळे प्रमुख महानगरे आणि महत्त्वाच्या प्रादेशिक ठिकाणांमधील संपर्क अधिक दृढ होईल.
उन्हाळ्याच्या गर्दीच्या पर्यटन हंगामात प्रवाशांसाठी सोय सुधारणे आणि देशभरातील कनेक्टिव्हिटीला चालना देणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.
अहवालानुसार, हे नवीन मार्ग मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख केंद्रांना पर्यटन आणि व्यावसायिक ठिकाणांसह विविध शहरांशी जोडतील.
या विस्तारामुळे जास्त मागणी असलेल्या मार्गांवरील प्रवाशांसाठी विमानसेवेच्या वारंवारतेचे पर्याय वाढतील आणि प्रवासाचा वेळ कमी होईल अशी अपेक्षा आहे.
नवीन मार्गांसाठी बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि एअरलाइनने हा विस्तार देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या आणि प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून सादर केला आहे.
हेही वाचा
