कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आता १५ आँक्टोंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तशी घोषणा केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. केंद्र सरकारने१ ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक-५ च्या गाईडलाईन्स लागू केल्या आहे. या गाईडलाईन्स दरम्यान केंद्र सरकार सिनेमागृहांना ५० टक्के उपस्थितीत १५ आँक्टोंबरपासून सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
As per orders of the Central Government, cinemas/ theatres/multiplexes will be reopening from 15th October. Halls have been directed to operate with up to 50% of their seating capacity: Union Information and Broadcasting Minister, Prakash Javadekar. #COVID19 pic.twitter.com/qBNbJbh9Uj
— ANI (@ANI) October 6, 2020
ऑक्टोबर महिन्यापासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय काही निर्बंध शिथील करु शकतं, असं बोललं जात असताना, बिहार निवडणुकाच्या पार्श्वभूमिवर केंद्रा सरकारने अनलॉक – ५ च्या गाईडलाईन्समधून सिनेमागृहांना आता परवानगी देण्यात आली आहे. मात्र परवानगी देताना केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी टाळणे अशा काही अटी-शर्ती देखील घातल्या आहेत. यामुळे येत्या १५ आँक्टोंबरपासून सिनेमागृह ही ५० टक्के प्रक्षेकांच्या उपस्थितीत सुरू राहणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.