भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. या बसेस भारत बंदचा भाग असणार नाहीत, अशी माहिती बेस्टच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली. बसेच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहेत. बसच्या खिडक्यांवर लोखंडी जाळ्या आणि इतर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल असेही बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
तसंच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलं आहे. मुबंईतील टॅक्सी सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय टॅक्सी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतल्या बस आणि टॅक्सीवर याचा परिणाम जाणवणार नाही.हेही वाचा -
११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर
मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं