Advertisement

प्लास्टिकच्या रस्त्यांनी तरी मिळणार का खड्ड्यांपासून मुक्ती ?

प्लास्टिकचा पुर्नवापर असे केल्यास प्लास्टिकचे विघटनही होईल आणि मुंबईकरांची प्लास्टिकमुळे होणा-या प्रदूषणापासून सुटका ही होईल. त्यामुळे रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करावा असा उपाय सुचविण्यात आला आहे.

प्लास्टिकच्या रस्त्यांनी तरी मिळणार का खड्ड्यांपासून मुक्ती ?
SHARES

प्लास्टिकवर बंदी असतानाही मुंबईत प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक ठिकाणी खुलेआम प्लास्टिक सरास वापरले जात आहे. त्यामुळेच प्लास्टिकचा  वापर कमी व्हावा आणि प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे. या दृष्टीकोनातून पालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही, त्यामुळे  परदेशात ज्या प्रमाणे प्लास्टिकचा वापर रस्ते बनवण्यासाठी केला जातो. त्याप्रमाणे पालिका ही प्लास्टिकचे रस्ते बवनण्याची योजना आखत आहे. प्लास्टिक रस्त्यांबाबत निविदा प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती पालिकेचे रस्ते अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे.

मुंबईचे नाले सध्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेले आहे. या नाल्यात साचलेल्या प्लास्टिकमुळे गटार, नाल्यात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नाल्यात टाकण्यात आलेले प्लास्टिक अडवून पाण्याचा निचरा करण्यासाठी लोखंडी जाळ्या ही पालिकेने लावल्या मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. म्हणूनच या प्लास्टिकचा पुर्नवापर असे केल्यास प्लास्टिकचे विघटनही होईल आणि मुंबईकरांची प्लास्टिकमुळे होणा-या प्रदूषणापासून सुटका ही होईल. त्यामुळे रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करावा असा उपाय सुचविण्यात आला आहे.

म्हणूनच प्लास्टिकवर पूर्णतहा बंदी घातली नाही

गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टिक रस्त्याबाबत प्रयोग सुरु होते. प्लास्टिक रस्त्यांबाबत हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्लास्टिकच्या रस्त्यांमध्ये डांबरी रस्त्याच्या मिश्रणात ६ ते ८ टक्के निरुपयोगी प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. २ ऑक्टोबरपासून भारतात प्लास्टिक बंदी होणार होती मात्र प्रत्यक्षात न होता भारतात अजूनही पुर्णपणे एकदा वापरात येणा-या प्लास्टिकवर पुर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारतात आलेले मंदीचे सावट. प्लास्टिक बनवणा-या कंपन्यांची किंमत ७.५ कोटी इतकी आहे ज्यात ७ कोटी लोक काम करतात. त्यामुळे जर का हा उद्योग बंद झाला तर ७ करोड लोकांची नोकरी जाऊ शकते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा