Advertisement

दुसरी लसमात्रा टाळणाऱ्यांवर राज्य सरकार लावणार काही बंधनं?

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. मात्र असं असलं तरी अनेक जण लस घेत नसल्याची माहिती मिळते.

दुसरी लसमात्रा टाळणाऱ्यांवर राज्य सरकार लावणार काही बंधनं?
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. मात्र असं असलं तरी अनेक जण लस घेत नसल्याची माहिती मिळते. त्यामुळं दुसरी लसमात्रा टाळणाऱ्यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केलं.

राज्याभरात पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. पण, दुसरी मात्रा घेण्यात बरेच जिल्हे मागे आहेत. दुसऱ्या लसमात्रेची मुदत उलटूनही जवळपास दीड ते पावणेदोन कोटी नागरिकांनी लशीकडे पाठ फिरवली आहे.

दुसरी लसमात्रा घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लससाठा आहे. लस उपलब्ध असतानाही नागरिक दुसरी मात्रा घेत नाहीत, याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओमायक्रॉनबाबत कोरोनाविषयक कृती दलाशी चर्चा केली आहे.

ऑमीक्रॉनबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळत आहेत. ओमायक्रॉनची लागण झालेला डोंबिवलीतील रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर कोणीही बाधित झालेला नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा