मुंबईत दरवर्षी जस्तीचा पाऊस पडल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. तसंच, मुसळधार पावसात रेल्वे मार्गावरील कल्व्हर्ट भरल्यास रुळांवर अनेकवेळा पाणी तुंबून मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत होत असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळं नालेसफाई, कल्व्हर्ट सफाईसाठी कमी अवधी उरला आहे. त्यामुळं पाणी उपसण्याचे पंप रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार, २५ मेपर्यंत पुरविण्याचे आदेश आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रेल्वे परिसरातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा पालिका आयुक्तांनी शुक्रवारी एका विशेष बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. या बैठकीत मुंबईपुढे कोरोनाचे संकट, लॉकडाउन, मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणी असल्या तरी पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी समन्वयाने पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली आहे.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे