देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लागू लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. तथापि, कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये घट झाल्यास देशातील काही भागात २० एप्रिलपासून लॉकडाउन शिथिल करण्यात येऊ शकतो. सामाजिक दुरावा आणि एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या हालचाली रोखून कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे, हे लॉकडाउनचे मुख्य उद्दीष्ट आहे.
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असल्यानं राज्य सरकारनं ई-पास प्रणाली लागू केली आहे. हा ई-पास वापरून लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ शकतात. ई-पासच्या सहाय्यानं आरोग्य, वैद्यकीय, वीज, पाणी यासारख्या आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ शकतो.
आम्ही तुम्हाला आपल्या राज्यात ई-पास कसे मिळवू शकता हे आम्ही सांगणार आहोत.
या यादीपैकी काही कारण असेल तरच तुम्हाला ई पास मिळेल.
तुम्हाला ई-पास हवा असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागेल. या अर्जात तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे.