Advertisement

परिस्थिती गंभीर ! दिवसभरात 97 मृत्यूची नोंद, 2091 नवे रुग्ण


परिस्थिती गंभीर !  दिवसभरात 97 मृत्यूची नोंद, 2091 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 758 झाली आहे. आज 2091 नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 1168   कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 16 हजार 954 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 36 हजार 004 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67  हजार  622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 97  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1792 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 39, पुण्यात 8, कल्याण-डोंबिवली 9, ठाणे 15, औरंगाबाद 1 , सोलापूर 6, मिराभाईंदर 5, उल्हासनगर 3, मालेगाव 3,  मृत्यूंची नोंद झाली आहे. माञ आज नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंमध्ये 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 63  पुरुष तर 34 महिला आहेत. आज झालेल्या 60 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 37 रुग्ण आहेत तर 49  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षांखालील आहे. या 97  रुग्णांपैकी 65 जणांमध्ये ( 67 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 269 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)*

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 414 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 65.91  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा