रविवारी सकाळपासून मुंबईत छान पाऊस पडतोय, समुद्र उसळला आहे. अनेकजण पावसाचा आणि उसळलेल्या समुद्राचा आनंद घेत सुट्टी एन्जाॅय करत आहेत. पण सोमवारी सकाळी-सकाळी मात्र कामाला जायची, मुलांना शाळेत सोडायची घाई असताना तुमची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी सकाळी चहासाठी दूध मिळेल की नाही याची शाश्वती नाही. हो...सोमवारी मुंबईत दुधाची टंचाई असणार आहे. याचं कारण म्हणजे सोमवारी मुंबईत 'दूध’कोंडी होणार आहे.
मुंबईत एक थेंबही दूध येऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला असून या दूधकोंडी आंदोलनाला सोमवारपासून राज्यभर सुरुवात होणार अाहे. त्यानुसार रविवारी रात्री १२ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. दूध उत्पादक दुधाचा थेंबही विक्रीसाठी पाठवणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. त्यामुळं मुंबईकरांनो, रविवारीच जरा जास्तीचं दूध खरेदी करून ठेवा.
म्हणून उपसलं आंदोलनाचं हत्यार
राज्यभरातील दूध उत्पादक सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. दूध उत्पादनासाठी प्रति लिटर ३५ रुपये खर्च येत असताना दूध उत्पादकांना प्रत्यक्षात मात्र प्रति लिटरमागे फक्त १७ रुपये इतका भाव मिळत आहे. त्यामुळं दूध उत्पादकांचं मोठ नुकसान होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी दुधाला प्रति लिटर २७ रुपये दर देण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे. पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होत नाही. सरकारकडं यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सरकार ढिम्म असल्यानं या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी आता थेट दूध उत्पादकांनी थेट आपला मोर्चा मुंबईकडं वळवला आहे.
राज्यभर आंदोलन
दुधाच्या हमीभावाकरता राज्यभर आंदोलन सुरू आहे. पण राज्याच्या राजधानीतून, मुंबईतून राज्याचा कारभार चालतो, त्या मुंबईचीच दूधकोंडी केल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना जाग येणार नाही, असं म्हणत शेट्टी यांनी १६ जुलैपासून मुंबईत एक थेंबही दूध येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. या इशाऱ्यावर शेट्टी आजही ठाम असून रविवारी रात्री १२ वाजल्यापासूनच या दूधकोंडी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. रात्री १२ वाजता पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करत या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं शेट्टी यांनी मुंबई लाइव्हला सांगतिलं आहे. तर सोमवारी मुंबईत दुधाचा एक तरी थेंब कसा येतो हे बघूच असा पुनरूच्चारही त्यांनी केला आहे.
'मुंबईत दूध येऊ देणार नाही'
या आंदोलनांतर्गत राज्यभरातील दूध उत्पादक दूध विक्रीस पाठवणार नाहीत. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणारं दूध सोमवारी काही येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं मुंबईतून जे काही दूध उत्पादीत होतं तेवढंच दूध मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी गुजरात आणि कर्नाटकमधून दूध आणण्यात येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गुजरात मार्गे येणारं दूध रोखण्यासाठी पालघरमध्ये तर कर्नाटकातून येणारं दूध रोखण्यासाठी कोल्हापुरातील महामार्गांवर कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावली आहे. हे कार्यकर्ते तिथल्या तिथं दूध रोखतील आणि मुंबईत दूध येऊ देणार नाही, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन अनिश्चित काळासाठी असल्यानं मुंबईतील ही दूधकोंडी किती दिवस सुरू राहणार हा प्रश्नच आहे.
रविवारी सकाळपासून मुंबईत छान पाऊस पडतोय, समुद्र उसळला आहे. अनेकजण पावसाचा आणि उसळलेल्या समुद्राचा आनंद घेत सुट्टी एन्जाॅय करत आहेत. पण सोमवारी सकाळी-सकाळी मात्र कामाला जायची, मुलांना शाळेत सोडायची घाई असताना तुमची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी सकाळी चहासाठी दूध मिळेल की नाही याची शाश्वती नाही. हो...सोमवारी मुंबईत दुधाची टंचाई असणार आहे. याचं कारण म्हणजे सोमवारी मुंबईत 'दूध’कोंडी होणार आहे.
मुंबईत एक थेंबही दूध येऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला असून या दूधकोंडी आंदोलनाला सोमवारपासून राज्यभर सुरुवात होणार अाहे. त्यानुसार रविवारी रात्री १२ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. दूध उत्पादक दुधाचा थेंबही विक्रीसाठी पाठवणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. त्यामुळं मुंबईकरांनो, रविवारीच जरा जास्तीचं दूध खरेदी करून ठेवा.
म्हणून उपसलं आंदोलनाचं हत्यार
राज्यभरातील दूध उत्पादक सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत. दूध उत्पादनासाठी प्रति लिटर ३५ रुपये खर्च येत असताना दूध उत्पादकांना प्रत्यक्षात मात्र प्रति लिटरमागे फक्त १७ रुपये इतका भाव मिळत आहे. त्यामुळं दूध उत्पादकांचं मोठ नुकसान होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी दुधाला प्रति लिटर २७ रुपये दर देण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे. पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होत नाही. सरकारकडं यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सरकार ढिम्म असल्यानं या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी आता थेट दूध उत्पादकांनी थेट आपला मोर्चा मुंबईकडं वळवला आहे.
राज्यभर आंदोलन
दुधाच्या हमीभावाकरता राज्यभर आंदोलन सुरू आहे. पण राज्याच्या राजधानीतून, मुंबईतून राज्याचा कारभार चालतो, त्या मुंबईचीच दूधकोंडी केल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना जाग येणार नाही, असं म्हणत शेट्टी यांनी १६ जुलैपासून मुंबईत एक थेंबही दूध येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. या इशाऱ्यावर शेट्टी आजही ठाम असून रविवारी रात्री १२ वाजल्यापासूनच या दूधकोंडी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. रात्री १२ वाजता पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करत या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं शेट्टी यांनी मुंबई लाइव्हला सांगतिलं आहे. तर सोमवारी मुंबईत दुधाचा एक तरी थेंब कसा येतो हे बघूच असा पुनरूच्चारही त्यांनी केला आहे.
'मुंबईत दूध येऊ देणार नाही'
या आंदोलनांतर्गत राज्यभरातील दूध उत्पादक दूध विक्रीस पाठवणार नाहीत. त्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणारं दूध सोमवारी काही येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं मुंबईतून जे काही दूध उत्पादीत होतं तेवढंच दूध मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी गुजरात आणि कर्नाटकमधून दूध आणण्यात येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गुजरात मार्गे येणारं दूध रोखण्यासाठी पालघरमध्ये तर कर्नाटकातून येणारं दूध रोखण्यासाठी कोल्हापुरातील महामार्गांवर कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावली आहे. हे कार्यकर्ते तिथल्या तिथं दूध रोखतील आणि मुंबईत दूध येऊ देणार नाही, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे आंदोलन अनिश्चित काळासाठी असल्यानं मुंबईतील ही दूधकोंडी किती दिवस सुरू राहणार हा प्रश्नच आहे.
हेही वाचा -
मुंबई पाकिस्तानात आहे का? दूध रोखून दाखवाच - चंद्रकांत पाटील
१६ जुलैपासून मुंबईत दूध'बाणी’!