कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागात स्टेशन परिसरातील गरजू लोकांना सुमारे १००० अन्नाच्या पाकिटांचं लाटप करण्यात आली आहे.
सर्व विभागांतील रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांची समर्पित पथके २४ तास कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई आणि मुंबई सेंट्रल येथील आयआरसीटीसी बेस किचनमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण (डाळ खिचडी) तयार करीत आहेत. आरोग्यविषयक मानदंडांचं पालन करून सुमारे २००० फूड पॅकेट तयार केली जात आहेत आणि त्याचे वाणिज्यिक विभाग आणि आरपीएफमार्फत वितरित केले जात आहे.
याव्यतिरिक्त, कॅटरिंग स्टॉल मालक, वाणिज्य विभाग कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी अन्न पॅकेट वितरणात वैयक्तिक योगदान देत आहेत. सोलापूर विभागात १४० खाद्यपदार्थांचे पाकिटे, नागपूर १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, पुणे विभाग १५० खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, मुंबई विभाग व भुसावळ जवळपास ३५० खाद्यान्न पाकिटे स्थानकांजवळील गरजू व गरीब लोकांना वाटण्यात आली आहेत.
हेही वाचा -