रविवारपासून मुंबईत (mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. हवामान खात्यानेही भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे. मुंबईतील विविध भागात झाडे (tree) पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
सोमवारी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पिवळा इशारा जारी केला, ज्यामध्ये म्हटले आहे की आज मुंबईत ढगाळ वातावरण राहील तसेच विजांच्या (thunder) कडकडाटासह अति मुसळधार पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुढील चार तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 31 अंश सेल्सिअस आणि 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) भारताच्या आर्थिक राजधानीच्या काही भागांसाठी आधीच लाल आणि नारंगी अलर्ट जारी केले आहेत.
खरं तर, रविवारी रात्री मुंबईत (mumbai rains) झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईतील पूरप्रवण भागात कुलाबा, मिठी नदीकिनारी असणाऱ्या वस्त्या आणि एच/ई, एच/डब्ल्यू आणि एफ/एन सारखे विशिष्ट वॉर्ड समाविष्ट आहेत.
हेही वाचा