Advertisement

बदलापूरमध्ये कंपनी आगीत जळून खाक

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या एकूण ९ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

बदलापूरमध्ये कंपनी आगीत जळून खाक
SHARES

राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. शुक्रवारी भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला.  त्यानंतर शनिवारी बदलापूरमध्ये लागलेल्या आगीत एक कंपनी जळून खाक झाली.  

बदलापुर खरवई एमआयडीसीतल्या ईस्टर इंडिया या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालं. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या एकूण ९ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आलं. मात्र, याआगीत सपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. मागील तीन महिन्यानपासून ही कंपनी बंद होती. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही.  ट्राय ब्यूटाइल हाइड्रो पेरिक्सीडे तयार करणारी ही कंपनी होती. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा