Advertisement

पुढचे २४ तास राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी


पुढचे २४ तास राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी
SHARES

राज्यात पुढच्या २ ते ३ दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाही तर येत्या २४ तासांतही मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक इथे येत्या २४ तासात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती ओढावली आहे. पालघर नाशिकमध्ये तीव्र मुसळधारचा इशारा IMD ने दिला आहे. तर बुधवारी पावसाचा जोर जरी कमी असला तरी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई-ठाणे उत्तर कोकणातसुद्धा पाऊस असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या ३ ते ४ दिवसांपासून राज्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. पण आता हा जोर वाढेल असं हवामान खात्याचे म्हणणे आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचा परिणाम विविध राज्यात होणार आहे.

बुलढाणा, अकोला, वाशिम, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवामान खात्याकडून करण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असून अकोल्यात आजही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

कोकणात रत्नागिरी येथे रविवारपासून मंगळवारपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला जाणवेल. ठाणे, रायगड येथे मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघरमध्ये बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मुंबईमध्ये मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे येथे बुधवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा