Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती

कोरोनामुळे गेल्या वर्षी १५ टक्केच बदल्या करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत बदल्या न करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती
SHARES

कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढले आहेत. जूनअखेर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन बदल्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात दरवर्षी एप्रिल-मेदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. मात्र, सध्या कोरोनाचा फैलाव झाल्याने राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या संकटामुळे कर्मचाऱ्यांवर ताण आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी १५ टक्केच बदल्या करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत बदल्या न करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

३० जूनपर्यंत बदल्या केल्या जाणार नाहीत. मात्र, आपत्कालीन बदल्या केल्या जाऊ शकतात.  सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे, कोरोना रोखण्याकरिता अत्यावश्यक सेवेतील पदे, गंभीर स्वरूपाच्या तक्रोरी प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची सक्षम अधिकाऱ्याची खात्री पटल्यास बदल्या करण्यास मुभा देण्यात आली आहे. 



हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा