मुंबईसह राज्यभरातील संवेदनशील अास्थापनांची सुरक्षा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी अचानक संप पुकारला. मंगळवार सकाळपासून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान ८ हजार जवान प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले असून त्यांच्या संपावर जाण्याने मुंबईतील ४० अास्थापनांसह महाराष्ट्रातील एकूण ९८ अास्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे राज्यात एकूण ८ डिव्हिजन असून या सगळ्यांनीच मंगळवार सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. भारत अगेंस्ट करप्शनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील या आंदोलनाचे नेतृत्व करत असून मंगळवारी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सगळे जवान पुण्याला जमणार आहेत. त्यानंतर तिथून हे सगळे जवान मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)