
ठाणे (thane) आणि भिवंडी (bhiwandi) दरम्यान रस्त्याने प्रवास करणे अधिक जलद होणार आहे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (mmrda) ठाण्यातील कोलशेत आणि भिवंडीतील काल्हेर यांना जोडण्यासाठी वसई खाडीवर सहा पदरी पूल बांधण्याची योजना आखत आहे.
एमएमआरडीएच्या प्रवक्त्याने सांगितले की, 2.2 किमी लांबीच्या या पुलाची किंमत अंदाजे 430 कोटी आहे. त्यामुळे दोन्ही उपनगरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे 45 मिनिटांवरून 5 ते 7 मिनिटांपर्यंत कमी होईल.
एमएमआरडीएने गुरुवारी या प्रकल्पासाठी निविदा जारी केल्या आहेत आणि तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (bullet train) कॉरिडॉरवर एक स्टेशन असणार्या भिवंडी या औद्योगिक केंद्राशी संपर्क सुधारण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
पॉवरलूम आणि लॉजिस्टिक्स उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात अलिकडच्या काळात ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकल्पाला गती देत आहेत, जे ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत.
वाहतूक कोंडी (heavy traffic) कमी करण्यासाठी आणि कापड क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी, कोलशेत-काल्हेर पुलाचे तातडीने बांधकाम करणे अत्यावश्यक आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा
