Advertisement

लॉकडाउनमुळे मुंबईच्या कचऱ्यात 'इतकी' घट

कोरोनामुळे प्रतिबंधित केलेला परिसर, इमारतींमधील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे मुंबईच्या कचऱ्यात 'इतकी' घट
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळं देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लाॉकडाउनमुळं अनेक मुंबईकर घरी विविध उपाययोजन आखून दिवस भरून काढत आहेत. या लॉकडाउनचा मुंबईकरांना विट आला असला तरी, सध्यस्थिती हा लॉकडाउन मुंबईतील प्रदुषण कमी करण्यास मदत करत आहेत. गेली काही लॉकडाउनमुळं मुंबई थांबली आहे. मुंबईकर घराबाहेर पडत नसल्यानं तसंच, वाहतुक बंद असल्यानं मुंबईची हवा सुधारली आहे. त्याचप्रमाणं मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी घटलं आहे. 

कोरोनामुळे प्रतिबंधित केलेला परिसर, इमारतींमधील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून बाधित, संशयितांनी वापरलेले मास्क, हातमोजे आदी मानखुर्द येथील जैविक कचरा विघटन प्रकल्पात नष्ट करण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांनी वापरून टाकलेले मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा कचरा इतर कचऱ्यासोबत देवनार कचराभूमीत जात असून त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यात येत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची सक्ती केल्यानंतर मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण कमी झालं आहे. मुंबईत दर दिवशी ६५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे कंपन्यांची कार्यालयं, दुकानं आदी बंद आहेत. 

नागरिकांना घरातच बसावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्यात ३० ते ३५ टक्क्यांनी म्हणजेच सुमारे २ हजार मेट्रिक टनाच्या आसपास कचरा कमी झाला आहे. कचऱ्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी करोनामुळं वैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळं महापालिकेनं अनेक परिसर, इमारती प्रतिबंधित केल्या आहेत. अशा ठिकाणचा कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यात येत आहे. 

प्रत्येक विभाग कार्यालयात कचरा वाहून नेण्यासाठी २ वाहनं उपलब्ध करण्यात आली असून, एका वाहनात केवळ प्रतिबंधित परिसर, इमारतीमधील कचरा वाहून नेण्यात येत आहे. या परिसरातील आरोग्याशी निगडित कचरा म्हणजे मास्क, हातमोजे, सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या आदींची मानखुर्द येथील जैविक कचरा विघटन प्रकल्पात विल्हेवाट लावण्यात येत आहे. तर उर्वरित कचरा देवनार कचराभूमीत खड्ड्यात पुरण्यात येत असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

परळच्या बेस्ट वसाहतीत दोघांना कोरोनाची लागण

अनावश्यक फिरणाऱ्यांची 5570 वाहनं केली पोलिसांनी जप्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा