Advertisement

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मार्चमध्ये पाण्याची टंचाई?

मुंबईला दिवसाला ३ हजार ७५० लिटर पाणी दिवसाला पुरवले जाते. यातील २७ टक्के पाणी हे पाणीगळती आणि पाणीचोरीमुळे वाया जात असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मार्चमध्ये पाण्याची टंचाई?
SHARES

मुंबईतल्या तलावातून लाखो लिटरचा साठा मुंबईला पुरवला जातो. मात्र जुन्या आणि जिर्ण झालेल्या पाईपातून पाणीगळतीचे प्रमाणही अधिक आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन या शहरासह उपनगरातून गेल्या आहेत. या पाईप लाइनमधून ४४० ठिकाणी पाणीगळती होत असल्यानं ही पाणी गळती रोखण्यासाठी पालिका ८ कोटी ७६ लाख खर्च करणार आहेत.


गळतीमुळे पाणी टंचाई?

मुंबईला दिवसाला ३ हजार ७५० लिटर पाणी दिवसाला पुरवलं जातं. यातील 27 टक्के पाणी हे पाणीगळती आणि पाणीचोरीमुळे वाया जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे तलावांमध्येही पाण्याचा साठा कमी उपलब्ध आहे. सध्या ७ दशलक्ष लीटरपेक्षा कमी प्रमाणात पाणी तलावात उपलब्ध आहे. मार्च महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं.

शहरात सध्या घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडमधील पाणीगळती रोखण्याच्या कामांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. मात्र तरीही घाटकोपरमध्ये सुमारे ३६३ जल वाहिन्यांतून गळती असल्याचं निदर्शनास आलं होतं. दक्षिण मुंबईतील ए, बी, सी, डी, ई विभागात ७८ गळत्या आढळल्या होत्या. प्रशासनानं त्या थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.


दुरूस्तीच्या कामाला सुरूवात

घाटकोपरमधून ५० ते १०० मीटर लांबीपर्यंतच्या जुन्या व गंजलेल्या ३७ जलवाहिन्या बदलण्याकरता ८७ लाख रुपये खर्च केले. दक्षिण मुंबईतील ए, बी आणि ई विभागात डिसेंबर २०१७ पासून ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत ७८ जलवाहिन्यांमधील गळती रोखली. यावेळी जलवाहिन्यांची कॅमेराद्वारे पाहणी करण्यात आली. त्यासाठी ५० लाख ९२ हजार रुपये खर्च केले

दरम्यान, यापुढेही ही कामं करण्यासाठी नवीन कंत्राटदाराची तातडीनं नेमणूक केली जाणार आहे. पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड विभागामधील पाण्याची गळती थांबवणे, दुषितीकरण रोखणं आणि अन्य संलग्न कामं करण्याकरता ४ कोटी ८९ लाख १३ हजार ९५६ रुपये, तर शहरातील गळती रोखण्यासाठी ३ कोटी ८७ लाख ७२ हजार असे ८ कोटी ७६ लाख ८५ हजार ९५० रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी मांडला आहे.



हेही वाचा

देशभरातील पेट्रोल पंपं सायंकाळी २० मिनिटं बंद राहणार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा