Advertisement

एलबीएस मार्गावरील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचा धडाका

अतिक्रमणांमुळे (encroachment) लाल बहादूर शास्त्री मार्गावर ( (Lal Bahadur Shastri Marg -एलबीएस) मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह पादचारीही त्रस्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

एलबीएस मार्गावरील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचा धडाका
SHARES

अतिक्रमणांमुळे (encroachment) लाल बहादूर शास्त्री मार्गावर ( (Lal Bahadur Shastri Marg -एलबीएस) मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह पादचारीही त्रस्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकने (Mumbai Municipal Corporation) येथील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली आहे. मागील १५ दिवसांपासून येथील अनेक अनधिकृत बांधकामं पालिकेने तोडली आहेत. 

रविवारी एलबीएस रोडवर घाटकोपर (ghatkopar) पश्चिम येथे २४ अनधिकृत बांधकामं पालिकेने उद्धवस्त केली. कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे पुन्हा उभी राहू नयेत, म्हणून पालिकने (Mumbai Municipal Corporation) येथे तात्काळ रस्ता रुंदीकरण करण्याचं काम होती घेतलं. एलबीएस मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. एलबीएस मार्गावर घाटकोपर पश्चिमेकडील प्रस्तावित रुंदीकरण प्रत्यक्षात येऊन पूर्व उपनगरातील वाहतूक अधिक वेगवान व सुलभ व्हावी यासाठी पालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहेत. रविवारच्या कारवाईत महिंद्रा पार्क ते महात्मा गांधी मार्गाच्या चौकादरम्यान २४ अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे हटवण्यात आली. ही कारवाई सुरू असताना स्थानिकांकडून विरोध करण्यात आला.

पूर्व उपनगर व शहर यांच्या दरम्यानचा लालबहादूर शास्त्री मार्ग (Lal Bahadur Shastri Marg -एलबीएस) हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा मार्ग १०० फूट करण्यात येणार आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या अतिक्रमणांमुळे (encroachment) एलबीएस रोडच्या रस्तारुंदीकरणात अडथळा आला होता. त्यामुळे महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) या रस्त्यावरील अतिक्रमणे तोडण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. 

 सायन (sion) ते थेट ठाण्यापर्यंत जाणारा पूर्व उपनगरातील एलबीएस रोड ((Lal Bahadur Shastri Marg) हा सर्वात मोठा रस्ता आहे. मुंबई-ठाण्यादरम्यानची वाहतूक या मार्गानेच होत असल्याने येथे सतत वर्दळ असते. पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर उड्डाणपुलाखालून येणारी वाहने एलबीएस मार्गावर येतात. भांडुप, मुलुंड, कांजूरमार्ग, विक्रोळी, ठाणे पश्चिमेकडून या मार्गावर नेहमीच वाहतूक सुरू असते. त्यामुळे येथे नेहमी प्रचंड वाहतूककोंडी असते

रस्त्याच्या दोन्ही बाजूला अधिकृत व अनधिकृत बांधकामे आहेत. अधिकृत बांधकामाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. मधल्या काळात अनधिकृत बांधकामे वाढली. त्यामुळे तर समस्येत आणखीन भर पडली. सध्या या मार्गावर वडाळा घाटकोपर ठाणे मेट्रो-४ मार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. हा मार्ग रुंद करण्याची नितांत आवश्यकता होती. 



हेही वाचा -

मस्करीची झाली कुस्करी, घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या

काॅन्स्टेबल शिंदेंची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा