Advertisement

मास्क न घालणाऱ्यांना पालिकेने दिली रस्त्यावर झाडू मारण्याची शिक्षा

जे कोणी दंड भरणार नाहीत त्यांना स्वच्छताविषयक कामे, जसे की झाडू मारणे करावी लागतील. अशा

मास्क न घालणाऱ्यांना पालिकेने दिली रस्त्यावर झाडू मारण्याची शिक्षा
SHARES

वारंवार आवाहन करून देखील कोरोना संक्रमण काळात मास्क न घालणाऱ्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पालिकेने त्यांना अनोखी शिक्षा सुनावली. मास्क न घालणाऱ्या निष्काळजी नागरिकांना पालिकेने रस्त्यावर झाडू मारून कचरा काढण्याची अनोखी शिक्षा सुनावल्याने त्यांना ही शिक्षा आता आयुष्यभर लक्षात राहिल. तसेच पून्हा अशी शिक्षा होऊ नये, म्हणून यापुढे मास्क शिवाय घराबाहेर पडण्याचे धाडस यापुढे ते लोक करणार नाहीत.

मास्क वापरणे सक्तीचे करून सुद्धा अनेक निष्काळजी लोक मास्कशिवाय मुंबईच्या अंधेरी भागात फिरत होते, परंतु बीएमसीने (BMC) त्यांना अशी शिक्षा दिली की याची त्यांना आयुष्यभर आठवण राहील. बीएमसीने असा इशारा दिला आहे की, विनामास्क फिरणाऱ्या लोकांनी दंड भरला नाहीत, तर शिक्षा म्हणून त्यांच्याकडून झाडू लावण्यात येईल. बीएमसी अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अनेक भागांमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी सुरु केली. सध्या कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात बाधित राज्य आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात सरकार गेले काही महिने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी जनजागृती करत आहे. बीएमसी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या लोकांकडून २०० रुपये दंड वसूल करत आहे. मात्र जे कोणी दंड भरणार नाहीत त्यांना स्वच्छताविषयक कामे, जसे की झाडू मारणे करावी लागतील. अशा लोकांना १ तासासाठी शहरामध्ये झाडू मारावा लागेल.

हेही वाचाः- ‘डी कंपनी’च्या ‘शार्प शूटर’ला अंधेरीतून अटक, ३ वर्षापासून होता वाॅन्टेड

ही मोहीम पालिकेच्या सर्व २४ वॉर्डात सुरू करण्यात आली असून मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘आम्ही २ महिन्यांपासून मास्क घालण्याचा नियम काटेकोरपणे लागू करीत आहोत आणि जे लोक मास्क घालत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. या नियमाचे उल्लंघन करून वर दंड न भरल्यास आम्ही अशा लोकांकडून स्वच्छताविषयक कामे करवून घेत आहोत.’ बीएमसीने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांकडून कोविड केअर सेंटर जवळील रस्ता साफ करून घेतला. तसेच काही लोकांना वृद्धांच्या मदतीसाठी नेमले. बीएमसीने आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांकडून तीन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, परंतु तरीही काही लोक मास्क न घालता फिरत आहेत. बीएमसीचे धीरज बांगर म्हणाले, ‘मास्क न घालणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इतके सांगूनही लोक मास्क घालत नाहीत. लोकांना मास्कचे महत्व समजावे म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत.’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा