गेल्या काही दिवासांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच चिंतेत वाढ झाली आहे.
आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्यातील झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. गुरुवारपासून हे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
'हे' आहेत नवे निर्बंध
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानं प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनानं नागरिकांची चिंता वाढवली आहे.
ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानं प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात गुरुवारी १९८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत ४५० ओमिक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १२५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.