Advertisement

मंत्रालयात एक दिवसाआड येणार कर्मचारी, राज्य सरकारचे नवे आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारनं मंत्रालयाच्या कामकाजात पुन्हा बदल घोषित केला आहे.

मंत्रालयात एक दिवसाआड येणार कर्मचारी, राज्य सरकारचे नवे आदेश
SHARES

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारनं मंत्रालयाच्या कामकाजात पुन्हा बदल घोषित केला आहे. यापूर्वी मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गर्दी टाळण्यासाठी दोन शिफ्टमध्ये येण्यास सांगण्यात आलं होतं. आता मात्र नवीन आदेश काढण्यात आले आहेत.

त्यानुसार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एका दिवसाआड बोलावण्यात येत आहे. कोरोना संसर्ग मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनानं म्हटलं आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, आपल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी कसे एक दिवसाआड येतील आणि त्यांच्या कामावर काही परिणाम होणार नाही याचं नियोजन करायचं आहे. यापूर्वी दोन शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या.

त्यामुळे आता सर्वांना एक दिवसाआड यावं लागणार आहे. त्या-त्या विभागातील सचिवांनी अशा प्रकारचे नियोजन करावं. तसंच जे कर्मचारी किंवा अधिकारी दिलेल्या शिफ्टमध्ये येण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांची त्या दिवसाची बिनपगारी सुटी गृहित धरली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत कमी झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. जवळपास नियंत्रणात आलेल्या कोरोनानं पुन्हा आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे, मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली.

याचमुळे मुख्य सचिवांनी आठवड्यात एक दिवसाआड कामाचे नियोजन करणं किंवा आठवड्यातील ३-३ दिवस कामाची जबाबदारी द्यावी असे निर्देश दिले होते. त्यानंतर आता नव्यानं आदेश जारी करण्यात आले आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्रात लाॅकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध- राजेश टोपे

विमान प्रवासात मास्क अनिवार्य, अन्यथा करता येणार नाही प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा