मुंबई उच्च न्यायालय दिवाणी आणि फौजदारी प्रकारांतील अत्यंत तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठीच कार्यरत ठेवण्याचे आदेश ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचं नियमित कमकाज ३१ ऑगस्टपर्यंत सुरु होणार नाही.
हे आदेश मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठासह गोवा हायकोर्टालाही राहतील. राज्यात कोरोनाच्या फैलावामुळे हे आदेश आधी १५ एप्रिल त्यानंतर १५ जून मग १५ जुलै आणि आता थेट ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. सध्या हायकोर्टात ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेणं सुरु आहे.
हेही वाचा