डान्सबारसंदर्भात राज्य सरकारच्या अनेक कठोर अटी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी रद्द केल्याने मुंबई आणि राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, कोर्टाचा हा निर्णय दुर्देवी असल्याचे सांगत याप्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.