पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘सौभाग्य’ या एका मोठ्या योजनेची घोषणा केली. या योजनेत अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकार सौभाग्य योजना जाहीर केली आहे.
या योजनेद्वारे गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिले जाणार आहे. जनगणनेच्या आधारावर ही सुविधा कुटुंबाना दिली जाणार आहे. ही योजना 16 हजार 320 कोटींची असून, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा या राज्यातल्या जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत 5 एलईडी बल्ब, पंखा आणि सोलार पॉवर पॅक वाटले जाणार आहे.
दरम्यान, पंडित दिनदयाळ यांच्या नावाने पंतप्रधान मोदीनी ‘सौभाग्य’ ही मोठी योजना जाहीर केली आहे. याबाबत त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली.