Advertisement

येस बँकेतील गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण

राज्यातल्या अनेक सहकारी, जिल्हा मध्यवर्ती बँका यासंबंधीची सेवा येस बँकेकडून घेतात. त्याचा परिणाम म्हणून सहकारी बँकांचे आरटीजीएस, एनईएफटी, धनादेश वटवणे असे ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत.

येस बँकेतील गैरव्यवहारामुळे  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे मिळण्यात अडचण
SHARES

येस बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निबंर्धांमुळे राज्यातल्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या अनेक सहकारी, जिल्हा मध्यवर्ती बँका यासंबंधीची सेवा येस बँकेकडून घेतात. त्याचा परिणाम म्हणून सहकारी बँकांचे आरटीजीएस, एनईएफटी, धनादेश वटवणे असे ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळत आहेत. येस बॅकेवरील रिझर्व बॅकेच्या निबंर्धामुळे राज्यातल्या बँकींग व्यवहारावर परिणाम होताना दिसत आहे.

हेही वाचाः- रंगाचा बेरंग झाल्यास महिनाभर तुरुंगात जाल

राज्यातील ७५ ते १00 सहकारी बँकांच्या ठेवी येस बँकेत असून बँकेवरील निबंर्धांमुळे हे पैसे अडकले आहेत. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील पैसेही येस बँकेत अडकल्याने हे पैसे शेतकर्‍यांना देण्यातही अडचण येत आहे. अनेक छोट्या बँका येस बँकेकडून आयएफएससी कोड सुविधा घेतात. त्यामुळे एका बँकेकडून दुसर्‍या बँकेकडे पैसे पाठवण्यातही बँकांना अडचणी येत आहेत. येस बँकेशी संलग्नित चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आनंद नागरी बँक, भंडारा अर्बन, अकोला अर्बन या बँकांचे धनादेश एलआयसी आणि नॅशनल इन्शुरन्सने स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या सर्व बँकांचे धनादेश क्लिअरिंग, आरटीजीएस आदी सेवा दोन दिवसांपासून बंद आहेत.

हेही वाचाः- ​सीबीआयकडून राणा कपूरांच्या मुलींच्या कार्यालयावर धाडसत्र​​​

दरम्यान स्टेट बॅकेकडून २४५0 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. आरबीआयने फेररचना योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे येस बँकेऐवजी दुसर्‍या मोठय़ा बँकेकडून सेवा घेणे सहकारी बँकांना शक्य आहे. येत्या तीन दिवसांत सर्व सहकारी बँकांचे व्यवहार सुरू होतील. दोन-तीन दिवस त्रास होईल, मात्र कोणत्याही खातेदार आणि ठेवीदाराच्या पैशांना धक्का लागणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा