Advertisement

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न- महापालिका आयुक्त


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू करण्याचे प्रयत्न- महापालिका आयुक्त
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट व एसटी महामंडळाकडून वाहतूक सेवा पुरवली जात आहे. या अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या, विरार, नालासोपारा, कल्याण, अंबरनाथवरून मुंबईत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दररोज ४ ते ६ तास प्रवासातच जात आहेत. त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू झाल्यास त्यांचा वेळ वाचेल, यासाठी राज्य सरकारची केंद्राबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, वैद्यकीय कर्मचारी व अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज कामाच्या ठिकाणी हजर राहावे लागते. लोकल बंद असल्यामुळं रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून त्यांचा दररोज किमान ४ ते ६ तास वेळ फुकट जात आहे. तसेच त्यांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

लॉकडाउन खुले करण्याबाबत राज्य सरकार तत्कालीन स्थितीवरून निर्णय घेणार आहे. मात्र मुंबई बाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे, मेट्रो सुरू झाल्यास त्यांचा वेळ वाचेल. पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत रेल्वे सुरू करावी आणि केवळ पालिकेची सेवा असणाऱ्या स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा