वेळ सकाळी साडे दहा...स्थळ मुंबईतील एलफिन्स्टन...नेहमीप्रमाणे एलफिन्स्टनच्या अरुंद ब्रिजवर चाकरमान्यांची लगबग. त्यात मुसळधार पाऊस. पावसापासून बचाव म्हणून चाकरमानी ब्रिजवरच थांबले. तेवढ्यात अचानक अफवा पसरायला सुरुवाच झाली आणि एकच गोंधळ सुुरु झाला. एक जण ओरडला पूल पडणार आहे, दुसरा ओरडला शॉर्ट सर्किट झाले आहे, अशी अफवाच वाऱ्यासारख्या पसरल्या. पुलावर प्रचंड गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत २२ मुंबईकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ३३ चाकरमानी जखमी झाले.
दुर्घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण? जर ही परिस्थिती योग्यवेळी हाताळली असती तर ही दुर्घटना टळली असती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांनी काय करायला हवे होते?
- मिलिंद वैद्य, प्रकल्प संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग
Video | Here's what the first 3 boys had to say about helping and saving people during the #ElphinstoneRoad stampede.@mumbaitraffic pic.twitter.com/zZnQwlsgKd
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) September 29, 2017
पहिली घटना - २९ ऑगस्टला पडलेल्या पावसात मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पण असे असतानाही कित्येकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर आणल्या होत्या. त्यापैकी अनेकांनी गाडी तिकडेच सोडून दिली होती. पण काही जण गाडीतच थांबले. त्यामुळे गाडीतच जीव गुदमरल्याने अनेकांनी आपले प्राण गमावले.
दुसरी घटना - काही वर्षांपूर्वी रेल्वेत एक घटना घडली होती. रेल्वेच्या महिला डब्यातून धूर येत होता. यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. महिलांनी एकमेकींना धक्का द्यायला सुरुवात केली. धक्काबुक्कीत दारात उभ्या असलेल्या महिलांवर भार पडला आणि यातच ६-७ महिला दारातून बाहेर पडल्या. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लोकल खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.
अशा परिस्थितीमध्ये गोंधळ होणं साहजिक आहे. स्वाभाविकही आहे. पण त्याचवेळी किमान थोडं प्रसंगावधान राखून काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कित्येकांचे जीव वाचू शकतात.