Advertisement

अखेर समीर वानखेडे यांची बदली, 'हे' दिलं कारण

मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे.

अखेर समीर वानखेडे यांची बदली, 'हे' दिलं कारण
SHARES

मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात समीर वानखेडे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप (audio clip) ऐकवत समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) निशाणा साधला होता.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच, एनसीबीचे झोनल डायरेक्टर आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ संपला आहे. ३१ डिसेंबरनंतर त्यांना मुदत वाढ न मिळाल्यानं ते आपल्या आयआरएस केडरमध्ये परत जातील.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी पत्रकार परिषदेत एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, ''मागील काळात बनवलेल्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत आहे. एक मॅडी नावाचा पंच आहे. एनसीबीचा किरण बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला ऑफिसमध्ये न बोलावता ऑफिसबाहेर बोलावून पंचनामा बदलण्याबाबत बोलत आहे. तसेच अधिकारी पंचाला जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत आहेत.''



हेही वाचा

मुंबईतल्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

पुढचे ३-४ दिवस मध्य रेल्वेची लोकल उशिरा धावणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा