महाविद्यालयांमध्ये जिथं भगवत् गीता वाटण्याचा निर्णय घेऊन वादंग निर्माण झाला असताना शिवसेनेनं मात्र, रुग्णांच्या हाती पुस्तक देत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ग्रंथालय बनवण्याची मागणी शिवसेनेचे माजी नामनिर्देशित नगरसेवक आणि सेंट झेवियर्सचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी करत रुग्णांसाठी पुस्तकं उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
टीबी रुग्णालयात ग्रंथालय सुरू
प्राध्यापक अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट झेविअर्स कॉलेजच्या मुलांच्या सहकार्याने शिवडी क्षयरोग रुग्णालयात रुग्ण आणि कर्मचाऱ्यांकरता ग्रंथालय सुरू करण्यात आलं. यावेळी विविध विषयांवरील ५०० ग्रंथसंपदा या रुग्णालयाला भेट म्हणून दिली. यानंतर सोमवारी प्राध्यापक अवकाश जाधव यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सर्व रुग्णालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली.
सर्व रुग्णालयात ग्रंथालय सुरू करा
शिवडी रुग्णालयाप्रमाणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना ग्रंथालयाचा निश्चितच उपयोग होईल. तसंच वाचन संस्कृतीही जोपासली जाईल. त्यामुळे महापालिकेनं स्वनिधीतून अथवा सीएसआर फंडातून बिगर शासकीय संस्था किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही ग्रंथालयं सुरू करावीत, अशी सूचना केली.
रुग्णालयांमध्ये दाखल होणारे रुग्ण हे आजारांमुळे वैफल्यग्रस्त होत असतात. त्यांची जगण्याची आशा मावळलेली असते. अशावेळी पुस्तकं त्यांचे चांगले सोबती बनू शकतात. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात अशाप्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिल्यावर तेथील रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदाचा भाव हा खूप काही सांगून जात होता. त्यांच्यात जगण्याची प्रेरणा त्यामधून मिळू शकते, असं जाधव यांनी म्हटलं आहे.
'यामुळे ग्रंथालय सुरू करा'
रुग्णालयांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं दैनंदिन जीवन तणावग्रस्त आणि धावपळीचं असतं. त्यांनाही या ग्रंथालयातील पुस्तकामुळे तणावमुक्त होता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे.
ज्यावेळी फावला वेळ असेल त्यावेळी ते या पुस्तकाचं वाचन करू शकतील. आधुनिक जगामध्ये वाचन संस्कृती लोप पावली असल्यामुळे विचार करण्याची क्रियाशीलता कमी झालेली आहे, ती यामुळे वाढवता येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुक्तांनीही या संकल्पनेला सहमती दर्शवत याला तत्वत: मान्यता दिली आहे.
महाविद्यालयांमध्ये जिथं भगवत् गीता वाटण्याचा निर्णय घेऊन वादंग निर्माण झाला असताना शिवसेनेनं मात्र, रुग्णांच्या हाती पुस्तक देत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ग्रंथालय बनवण्याची मागणी शिवसेनेचे माजी नामनिर्देशित नगरसेवक आणि सेंट झेवियर्सचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी करत रुग्णांसाठी पुस्तकं उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
टीबी रुग्णालयात ग्रंथालय सुरू
प्राध्यापक अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट झेविअर्स कॉलेजच्या मुलांच्या सहकार्याने शिवडी क्षयरोग रुग्णालयात रुग्ण आणि कर्मचाऱ्यांकरता ग्रंथालय सुरू करण्यात आलं. यावेळी विविध विषयांवरील ५०० ग्रंथसंपदा या रुग्णालयाला भेट म्हणून दिली. यानंतर सोमवारी प्राध्यापक अवकाश जाधव यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सर्व रुग्णालयांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली.
सर्व रुग्णालयात ग्रंथालय सुरू करा
शिवडी रुग्णालयाप्रमाणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना ग्रंथालयाचा निश्चितच उपयोग होईल. तसंच वाचन संस्कृतीही जोपासली जाईल. त्यामुळे महापालिकेनं स्वनिधीतून अथवा सीएसआर फंडातून बिगर शासकीय संस्था किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही ग्रंथालयं सुरू करावीत, अशी सूचना केली.
रुग्णालयांमध्ये दाखल होणारे रुग्ण हे आजारांमुळे वैफल्यग्रस्त होत असतात. त्यांची जगण्याची आशा मावळलेली असते. अशावेळी पुस्तकं त्यांचे चांगले सोबती बनू शकतात. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात अशाप्रकारची पुस्तके उपलब्ध करून दिल्यावर तेथील रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदाचा भाव हा खूप काही सांगून जात होता. त्यांच्यात जगण्याची प्रेरणा त्यामधून मिळू शकते, असं जाधव यांनी म्हटलं आहे.
'यामुळे ग्रंथालय सुरू करा'
रुग्णालयांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं दैनंदिन जीवन तणावग्रस्त आणि धावपळीचं असतं. त्यांनाही या ग्रंथालयातील पुस्तकामुळे तणावमुक्त होता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे.
ज्यावेळी फावला वेळ असेल त्यावेळी ते या पुस्तकाचं वाचन करू शकतील. आधुनिक जगामध्ये वाचन संस्कृती लोप पावली असल्यामुळे विचार करण्याची क्रियाशीलता कमी झालेली आहे, ती यामुळे वाढवता येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुक्तांनीही या संकल्पनेला सहमती दर्शवत याला तत्वत: मान्यता दिली आहे.